• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात कोहली-पंत खेळणार नाही,

by pravin
February 19, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

कोलकाता- बीसीसीआयने ( (BCCI) भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि ऋषभ पंतला वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) शेवटच्या टी-२० सामन्याआधीच बायो बबलमधून ब्रेक दिला आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू आपआपल्या घराकडे रवाना झालेत. ते दोघेही वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सहभागी होणार नाहीत.

 

बीसीसीआयने विराट कोहली आणि ऋषभ पंतला १० दिवसांचा ब्रेक दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळेच दोघेही श्रीलंके विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सहभागी होणार नाही. २४ फेब्रुवारीपासून लखनौमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिक सुरू होत आहे. यानंतर श्रीलंका आणि भारतात २ सामन्यांची कसोटी मालिका देखील होणार आहे. यात विराट कोहली आणि ऋषभ पंत सहभागी होतील. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी मालिका कोहलीसाठी १०० वा कसोटी सामना असेल.

दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कोहली आणि पंत दोघांनीही शानदार अर्धशतकी खेळी केली. कोहलीने सुरुवातीला डाव संभाळला, तर पंतने सामन्याच्या अखेरीस दमदार कामगिरी केली.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या रोमांचक टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ८ धावांनी मात दिली. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित ब्रिगेडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. वेस्ट इंडीजचा कप्तान कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी दमदार अर्धशतके ठोकत पाहुण्यांना १८७ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने दमदार झुंज दिली. निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी मोठ्या फटक्यांची आतषबाजी करत संघाला विजयाजवळ नेले, पण त्यांची झुंज अपुरी ठरली. विंडीजचा संघ २० षटकात ३ बाद १७८ धावांपर्यंतच पोहोचू शकला. भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Tags: bbciCaptionsCricketrishabh pantVirat Kohli
ShareTweetSend
Next Post

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.