ग्लासगो | स्पोर्ट्स पॅनरामा वृत्तसंस्था
भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती आणि स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटात दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. चानूने एकूण १९० किलो वजन उचलत स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला आणि भारताच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णाची भर घातली.
मीराबाईने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १०५ किलो वजन उचलले.या दोन्ही प्रकारांसह एकूण १९० किलो वजन उचलत तिने तिन्ही प्रकारांमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे नवे विक्रम नोंदवले.
या विजयासह मीराबाई चानूने सलग तिसरे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला.तसेच तिच्या कारकिर्दीतील हे सलग चौथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक ठरले आहे.
भारतासाठी सातत्याने गौरवशाली कामगिरी करणाऱ्या मीराबाई चानूच्या या ऐतिहासिक यशाबद्दल देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कामगिरी एका नजरेत
🥇 महिलांचा ४८ किलो वजनी गट – सुवर्णपदक
🏋️ स्नॅच – ८५ किलो (स्पर्धा विक्रम)
🏋️ क्लीन अँड जर्क – १०५ किलो (स्पर्धा विक्रम)
🏋️ एकूण – १९० किलो (स्पर्धा विक्रम)
🥇 सलग तिसरे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक
🏅 सलग चौथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक



