• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 21, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

भारताचा श्रीलंकेवर २२२ धावांनी महाविजय

by pravin
March 7, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मोहाली- मोहनी पार पडले पडलेल्या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी श्रीलंकेवर वर्चस्व.रवींद्र जडेजा (४/४६) आणि रविचंद्रन अश्विन (४/४७) या अनुभवी जोडीने पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाला फिरकीच्या तालावर नाचवले. त्यामुळे मोहाली येथील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी महाविजय मिळवला.

शनिवारच्या ४ बाद १०८ धावांवरून पुढे खेळतानाही श्रीलंकेची घसरगुंडी कायम राहिली. रवींद्र जडेजाने कारकीर्दीत १०व्यांदा डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्याला जसप्रीत बुमरा, अश्विन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून उत्तम साथ दिली. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव १७४ धावांत संपुष्टात आला. पथुम निसंकाने (नाबाद ६१) श्रीलंकेकडून एकाकी झुंज दिली. भारताने तब्बल ४०० धावांची आघाडी मिळवल्यामुळे श्रीलंकेवर फॉलोऑन लादला.

 

दुसऱ्या डावात श्रीलंकन फलंदाजांकडून कडव्या प्रतिकाराची अपेक्षा होती. परंतु जडेजा-अश्विनपुढे त्यांनी पुन्हा एकदा शरणागती पत्करली आणि ६० षटकांत १७८ धावांत त्यांचा दुसरा डावही आटोपला. निरोशन डिकवेल्लाने (नाबाद ५१) यावेळी झुंज देण्याचा प्रयत्न केला. कर्णधार दिमुथ करुणारत्ने (२७), अँजेलो मॅथ्यूज (२८), धनंजया डीसिल्व्हा (३०) यांनीही काही काळ भारताचा विजय लांबवला. अखेर अश्विनने लाहिरू कुमाराला बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या दिवशी तब्बल १६ गडी गारद झाले.

मोहालीचे मैदान माझ्यासाठी फलदायी ठरते. १७५ धावांच्या खेळीदरम्यान कोणते विक्रम मोडले, याची मला कल्पना नाही. मी नैसर्गिक खेळावर भर दिला. परंतु संघासाठी अष्टपैलू योगदान देता आल्याचे समाधान आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी आतुर आहे.

५ भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील पाचवा, तर मोहालीतील सर्वात मोठा विजय ठरला.

 

३ एकाच कसोटीत दीड शतक आणि डावात पाच बळी असा दुहेरी पराक्रम करणारा रवींद्र जडेजा हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी, विनू मंकड (वि. इंग्लंड, १९५२) आणि पॉली उम्रीगर (वि. वेस्ट इंडिज, १९६२) यांनी अशी कामगिरी केली होती.

 

Tags: indiaPlaySri LankaWin the match
ShareTweetSend
Next Post

ऑस्ट्रेलियाचे झुंजार प्रत्युत्तर नक्की वाचा;

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.