• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, July 20, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

सर्फराजच्या द्विशतकामुळे मुंबईचा धावांचा डोंगर;

by pravin
February 19, 2022
in क्रिकेट
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

मुंबई – युवा सर्फराज खानने साकारलेल्या २७५ धावांच्या मॅरेथॉन द्विशतकी खेळीच्या बळावर ४१वेळा रणजी विजेत्या मुंबईने सौराष्ट्रविरुद्ध रणजी करंडक (ड-गट) लढतीच्या दुसऱ्या दिवशी ७ बाद ५४४ धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला.

सर्फराजने १२१ धावसंख्येवरून शुक्रवारी आपल्या डावाला पुढे प्रारंभ करीत सौराष्ट्रच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला करीत ३० चौकार आणि सात षटकारांनिशी ४०१ चेंडूंत आपली पावणेतीनशे धावांची खेळी उभारली. मुंबई संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे १२९ धावसंख्येवर बाद झाला. परंतु त्याने भारताच्या कसोटी संघातील आपली दावेदारी मजबूत केली. सर्फराज आणि रहाणे यांनी चौथ्या गडय़ासाठी २५२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळेच ३ बाद ४३ धावांवरून मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली.

अनुभवी यष्टिरक्षक आदित्य तरे (२२) आणि शाम्स मुलानी (१२) लवकर बाद झाल्यानंतर सर्फराजला आठव्या क्रमांकावरील तनुष कोटियनची (नाबाद ५०) उत्तम साथ लाभली. या जोडीने सातव्या गडय़ासाठी ११८ धावांची भागीदारी करीत मुंबईला पाचशेचा टप्पा ओलांडून दिला. मग प्रेरक मंकडने पायचीत करीत सर्फराजला त्रिशतकापासून रोखले. उत्तरार्धात सौराष्ट्रने बिनबाद १८ धावा केल्या. सलामीवीर हार्विक देसाई आणि स्नेल पटेल अनुक्रमे ६ आणि ११ धावांवर खेळत होते.

 

पदार्पणवीर पवनचे दमदार द्विशतक

 

रोहतक : महाराष्ट्राचा सलामीवीर पवन शहाने रणजी स्पर्धेतील आसामविरुद्धच्या सामन्यात पदार्पणातच द्विशतकी खेळी साकारली. २२ वर्षीय पवनच्या २१९ धावांमुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात ४१५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात आसामची दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात २ बाद ८१ अशी धावसंख्या होती. मुकेश चौधरीने रिषव दासला (१४), तर मनोज इंगळेने गोकुळ शर्माला (५) माघारी पाठवले. मात्र, सलामीवीर शुभम मंडल (नाबाद ३४) आणि रियान पराग (नाबाद २६) यांना आसामचा डाव सावरला. तत्पूर्वी, ग-गटातील या सामन्यात दुसऱ्या दिवशी ५ बाद २७८ धावांवरून पुढे खेळणाऱ्या महाराष्ट्राचा पहिला डाव ४१५ धावांवर संपुष्टात आला. पवनने ४०१ चेंडूंत २० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २१९ धावांची खेळी केली. त्याला दिव्यांग हिंगणेकर (४६) आणि सत्यजीत बच्छाव (५२) यांची तोलामोलाची साथ लाभली. त्यामुळेच महाराष्ट्राला ४०० धावांचा टप्पा पार करता आला. आसामकडून मुख्तार हुसेनने ८८ धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद केले.

Tags: CricketDouble centuryMumbaiRanjit trophy
ShareTweetSend
Next Post

जयपूर पिंक पँथर्स vs पुणेरी पलटण 7:30pm

ताज्या बातम्या

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ : भारतीय बॉक्सिंग संघटनेचे निरीक्षक म्हणून डॉ. राकेश तिवारी यांची नियुक्ती

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल 2026; अल इरफान हायस्कूल विजेता

जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल कप 2026-27 स्पर्धेला दिमाखात प्रारंभ; 15 वर्षांखालील गटात 17 संघांचा सहभाग

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्रीडा क्षेत्रात खळबळ! राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या प्रमाणपत्रांवरून नवा वाद; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.