दाम्बुल्ला (श्रीलंका): भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील त्रिराष्ट्रीय मालिकेतील चौथ्या सामन्यानंतर मैदानावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंका ‘अ’ संघातील एका खेळाडूमध्ये शाब्दिक वाद झाल्याची घटना सोमवारी (१५ जून) समोर आली.
सामना संपल्यानंतर वैभव सूर्यवंशी काहीसा संतप्त दिसत होता. श्रीलंकेच्या खेळाडूकडून केलेल्या एका टिप्पणीमुळे तो नाराज झाला आणि संबंधित खेळाडूकडे जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी श्रीलंकेचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेला यांनी तत्परता दाखवत हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
टीव्ही रिप्लेमध्ये श्रीलंका ‘अ’ संघातील खेळाडूने १५ वर्षीय वैभवबाबत काही टिप्पणी केल्याचे दिसून आले. त्यानंतर वैभवने थेट त्या खेळाडूला सामोरे जात आपली नाराजी व्यक्त केली. सुदैवाने, डिकवेलाच्या मध्यस्थीमुळे वाद वाढण्यापूर्वीच शांत झाला.
सुपर ओव्हरमध्ये वैभवचे योगदान
या सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३ चेंडूत ६ धावा करत संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले. युवा वयातच आक्रमक फलंदाजी आणि आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे वैभव चर्चेत आहे.
क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांमध्ये शाब्दिक चकमकी नवीन नसल्या तरी १५ वर्षीय खेळाडूने मैदानावर दाखवलेला आत्मविश्वास आणि त्यानंतर घडलेला प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
सुपर ओव्हरनंतर हाय-व्होल्टेज नाट्य घडले व्हिडिओ




